यांचे गोरेगाव येथे निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या.
मृणाल गोरे व कमल देसाई या लाटणे व पाणीवाली बाई म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने कष्टकरी, मध्यमवर्गीय महिला सहभागी होत असत. यामुळे मुंबई ठप्प होत असे.
यांचे गोरेगाव येथे निधन झाले. त्या 97 वर्षांच्या होत्या.
मृणाल गोरे व कमल देसाई या लाटणे व पाणीवाली बाई म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने कष्टकरी, मध्यमवर्गीय महिला सहभागी होत असत. यामुळे मुंबई ठप्प होत असे.
यांच्याशी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा केली.
पोस्ट कार्यालय दुरुस्ती -
पोस्ट विभागाने, 2 वर्षात दुरुस्ती केली जाईल असे म्हटले होते. खासदार गजानन किर्तीकर यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न करत आहेत.
ओशिवरा नदी स्वच्छता -
ओशिवरा ही नदी आहे असे त्यांनी मान्य केले. स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामे झाली आहेत. खाडी बुजवली गेली. पालिकेने याकडे लक्ष द्यावे.
अंधुक दिवे खांब -
रिलायन्स नवीन खांब लावत आहे. अनेक खांब जुने, गंजलेले आहेत. ते बदलून नवीन लावण्याची आम्ही मागणी केली आहे. अनेक गार्डनमध्ये दिवे बंद असतात.
पोलिस गस्त -
पोलिसांनी गस्त पध्दतीकडे लक्ष द्यावे.
पालिका शाळा -
इंग्रजी वर्ग सुरु करण्यात आले आहेत. पालकांनी मुलांना पालिका शाळेत पाठवावे.
एस. व्ही रोड येथे शौचालय बांधण्याची मागणी केली आहे. भगतसिंग नाका येथे सुलभ शौचालय बांधले आहे.
च्या माध्यमातून - लक्ष्मी नगर, लिंक रोड ते महाकाली मंदिर या रस्त्याचे भूमीपूजन !!!!!
मुम्बई - दि.4/2/2018 रोजी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा . दिलीप भाऊ शेजवळ यांच्या हस्ते करण्यात आले.
गेली पाच वर्ष या रस्त्याच्या कामासाठी ऑल इंडिया अँड हॉकर्स कामगार युनियन ने याचा पाठपुरावा करून प्रथमला आलेले टेंडर काही कारणास्तव बाद झाले . पुन्हा नव्याने टेंडर काढण्यास भाग पाडले . स्थानिक लोकांची मागणी होती लिंक रोड व वसंत ग्यालक्षी दोन्ही बाजूला रस्ते उंच झाल्याने मध्ये लक्ष्मी नगर येथे मोठयाप्रमाणात पाणी साचायाचे .
लहान मुले व्रुध्द माणसे यांना खूप त्रास व्हायचा . शेवटी रस्त्याचा मुहूर्त झाला .
प्रमुख उपस्थिती - अध्यक्ष - मिलिंद जाधव (सर), जनरल सेक्रेटरी - सुनील घोष. महिला अध्यक्षा - लक्ष्मी कदम , वार्ड अध्यक्ष -विजय काळे , प्रा . विलास बनसोडे, रफिक जवेरी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
https://youtu.be/oua-IhsGdRs
ने मुंबई कांग्रेस अध्यक्ष ,संजय निरुपम जी के जन्मदिन के अवसर पर शुभकामनाएं दे कर कहा हैं !
2019 में उनको केंद्रीय मंत्री के रूप में देखना चाहते
Niranjan Pal Congress Leader
यांच्या कार्यालयात विभागातील समस्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी कार्यालयातून खालील विषयावर चर्चा करण्यात आली.
ओशिवरा नदी स्वच्छता -
हि नदी रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येते. रेल्वे प्रशासन गाळ, कचरा काढते व तिथेच काठावर ठेवते. त्यामुळे तो गाळ पुन्हा नदीत जातो.
पालिका गाळ काढते व डंपिंग ग्राऊंडला टाकते. तबेले मालकांना नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली आहे.
आरे भुयारी मार्ग सुरक्षा रक्षक -
एनजीओची नेमणुक करुन भुयारी मार्गाची देखभाल करणार आहोत.
रोहिदास नगर समोरील विहिर स्वच्छता -
ती विहिर डेड झाली आहे. पाणी चिकट स्वरुपाचे आहे.
अशोक नगर मध्ये सुविधा कामे मुद्दाम केली जात नाहीत का ?
- कोणती कामे केली व करत आहोत यासंबंधी सर्व फाईल दाखवली.
यांच्या कार्यालयात तीन डोंगरी, प्रेम नगर रोड येथील प्रश्नांचे निवेदन दिले होते. त्यावेळी समीर देसाई यांच्याशी खालील विषयावर चर्चा करण्यात आली.
प्रेम नगर रोडवर अंधूक दिवे -
वीज अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. थोडा अधिक उजेड असलेले दिवे लावण्यात येतील.
रहदारी त्रास वाढला आहे -
आजुबाजूच्या इमारतींनी पत्र दिल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येईल.
या रोडवरील दोन्ही बगीचे मार्चपर्यंत सुशोभित करण्यात येतील.
प्रेम नगर कॉर्नरला सीसीटीव्ही लावण्यात येईल. जुने एसीपी कार्यालय चौक येथे सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.
प्रेम नगर येथे पोलिस बीट चौकी बनविण्यात येईल.
यावेळेस शिवशक्ती मित्र मंडळाचे पदाधिकारी व गोरेगाव भाजपा सचिव निलेश सोमजी, सचीन शर्मा उपस्थित होते.
समस्यांविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी खालील विषयावर चर्चा करण्यात आली.
मोतीलाल नगर येथील पोस्ट कार्यालय दुरुस्ती -
ते म्हणाले की, यासंदर्भात नवीन पोस्ट कार्यालय बांधावे किंवा दुरुस्त करावे यासाठी
दिल्ली येथे केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा यांची भेट घेऊन या विषयाचे पत्र देण्यात आले. त्यांनी लवकरात लवकर पोस्ट विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
या पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या -
तसे त्यांनी पत्र दिल्यास समस्या दूर करण्याचा प्रयत्न करु.
ओशिवरा नदी स्वच्छता -
त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नदीच्या भागाची स्वच्छता केली जाते. पालिकेला सूचना केली जाते.
यावेळी गोरेगाव भाजपा उपाध्यक्ष व शिवाय चँरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिन भिलारे उपस्थित होते.
पी दक्षिण विभाग कार्यालयातील 2 रा, 4 था मजला येथे संबंधीत अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली.
वरिष्ठ अधिकारी मिटींगला गेले होते. पर्यायी कोणतेही अधिकारी नव्हते.
अधिकाऱ्यांना ओशिवरा ही नदी आहे याचा पत्ताच नाही. त्यांना तो नाला वाटत आहे. पालिकेत ओशिवरा ही नदी म्हणून नोंद आहे, हे त्यांना सांगावे लागले.
चर्चा केल्यानंतर ते म्हणाले की, येथील जनतेत जनजागृती झाली पाहिजे. लोकांना तिथे कचरा टाकताना आम्ही पाहिले आहे.
आम्ही काय कारवाई केली याबाबत लेखी पत्र देण्यात येईल.
सिध्दार्थ हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रतिमा पाटील यांची भेट घेऊन हॉस्पिटलमधील प्रश्न मांडले.
त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते की, काहीच समस्या नाहीत. रुग्णांना सर्व सुविधा व्यवस्थित मिळत आहेत.
त्यांचे म्हणणे आहे,
- डेंग्यू, टायफाईड टेस्ट होतात.
- ब्लड ग्रूप टेस्ट होतात.
- एक्स रे मशीन चांगल्या आहेत. कधीच बंद पडत नाहीत.
- रुग्णांना औषधे बाहेरुन आणण्यास सांगितले नाही.
रुग्णांच्या तक्रारी असल्यास थेट त्यांच्याशी संपर्क करावा, असे त्यांनी सांगितले.
त्यांना विचारले की,
प्रशासनास आपल्या काही सूचना असल्यास आम्ही कळवू.
तेव्हा त्या म्हणाल्या की, आम्ही आमच्या लेवलवर करु.
म्हणजे या रुग्णालयात काही सुविधा मागणी करायची असेल तर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच भेटा. पत्रव्यवहार करण्यात वेळ घालवू नका.
www.aaplegoregaon.blogspot.com
नगरसेवक हर्ष पटेल यांना भेटून स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली.
1) स्टेशनवरील स्कायवॉकवर दिवे बंद असतात, सुरक्षा रक्षक नाहीत.
- यासंबंधी पालिकेशी बोलणे केले आहे. कंत्राट देऊन मार्चपर्यंत सुधारणा करण्यात येईल.
2) आरे रोडवरील भुयारी मार्गात सुरक्षा रक्षक व इतर सुधारणा
- 6 महिन्यात येथे सुधारणा केली जाईल.
3) फेरीवाले प्रश्न
स्टेशनवरील फेरीवाले यांना सुरुवातीला समजवून सांगण्यात आले की, थोडे मागे बसा. येजा करणाऱ्या जनतेला उध्दट बोलू नका.
पण ते ऐकत नव्हते म्हणून स्टेशनवरील फेरीवाल्यांना हटवले.
4) एस व्ही रोडवर कोठेही शौचालय नाही.
- टोपीवाला मंडईसमोर शौचालय बांधत आहोत. भूमीपूजन केले आहे.
5) फिल्मीस्तानच्या मागच्या रस्त्यावरील दिवे अंधूक आहेत. रात्री काहीच दिसत नाही. गुन्हेगारी वाढली आहे.
(त्यांनी हा विषय लिहून घेतला)
6) पोलिस गस्त व्यवस्थित होत नाही. दर्जा घसरला आहे.
- आमचे नेते जयप्रकाश ठाकूर, आमदार विद्या ठाकूर यांना हा मुद्दा सांगणार आहे. संपूर्ण गोरेगावमधील पोलिस गस्त पध्दत सुधारली पाहिजे.
7) सर्टीफिकेट प्रश्नामुळे आपले नगरसेवक पद अडचणीत येईल का ?
- मी कोणताही फ्रॉड केलेला नाही.
www.aaplegoregaon.blogspot.com
प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत. दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल. ...